कार्यालय वेळ: 10:00 am - 05:00 pm

Chhatrapati Shivaji Maharaj
महाराष्ट्र शासन
ग्रामपंचायत मलिकपेठ
अधिकृत संकेतस्थळ
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj
Dr. Babasaheb Ambedkar

ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय, मलिकपेठ

तालुका: मोहोळ ,जिल्हा : सोलापूर

आता मलिकपेठ    ग्रामपंचायतीचे सर्व निर्णय, विकास कामे, शासकीय योजना आणि नागरिक सेवा – सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध!

360_F_940899247_Nv7FXAnGvOsuHFgJnTIlensGkjxK0RAh

आमच्याबद्दल

मलिकपेठ हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये असलेले एक गाव आहे. जेथे प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते. हे गाव मोहोळपासून ५ किमी. अंतरावर सिना नदी काठी वसलेले, भौगोलिकदृष्टीने आकर्षक असे सर्व सोयी सुविधायुक्त असे गाव आहे.

गावाचे ग्रामदैवत “मलिकबाबा” आहे. उत्सवकालावधीत सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. तसेच गावामध्ये “शिवशंभू” महादेवाचे आकर्षक मंदीर असून “महाशिवरात्री” दिवशी खूप मोठी यात्रा भरते. तसेच गावामध्ये सुसज्ज हनुमान मंदीर आहे.

ग्रामपंचायत मलिकपेठ अंतर्गत १) खरखटणे २) दांगडेवाडी ३) मलिकपेठ वरील तीन महसुली गावे येतात. या तिन्ही गावाची मिळून एक ग्रुप ग्रामपंचायत आहे.

खरखटणे येथील हनुमान देवस्थान जागृत देवस्थान असून दर शनिवारी भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात, व भाविकांची मनोकामना पूर्ण होते. सर्व ग्रामस्थ गुण्यागोविंदाने एकत्र येऊन वर्षभरातील सण उत्सव, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतात.

माननीय मंत्री व पदाधिकारी

माननीय मुख्यमंत्री

श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय उपमुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री

श्रीमती सुनेत्रा पवार

माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. जयकुमार गोरे

गट विकास अधीकारी

श्री. विवेक जमदाडे

सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहोळ

श्री. विजयकुमार रामचंद्र देशमुख,

विस्ताराधिकारी ग्रामपंचायत विभाग पंचायत समिती मोहोळ

संगनबसप्पा रेवणसिद्ध ठक्का

ग्रामपंचायतीचे पदाधिकारी

श्री गणेश मधुकर जगताप

सरपंच

श्री पांडुरंग नामदेव साठे

उपसरपंच

श्रीमती माळी पार्वती कुंडलिक

ग्रामपंचायत अधिकारी

गावाची माहिती

व्यवसाय आणि अर्थव्यवस्था

गावाच्या आर्थिक विकासासाठी स्थानिक व्यवसाय, शेती, लघुउद्योग आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे हे ग्रामपंचायतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. शेतकरी, कारागीर, व्यापारी व उद्योजक यांना विविध शासकीय योजना, प्रशिक्षण कार्यक्रम आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देऊन रोजगारनिर्मितीला चालना दिली जाते. स्थानिक बाजारपेठेचा विकास, महिला बचत गटांचे सक्षमीकरण आणि युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन गावाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी ग्रामपंचायत सातत्याने कार्यरत आहे.

संस्कृती आणि इतिहास

आमचे गाव समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक परंपरांनी नटलेले आहे. येथे सण-उत्सव, लोककला, धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडते. गावातील मंदिरे, यात्रा, जत्रा व पारंपरिक कार्यक्रम हे गावाच्या इतिहासाचे व संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहेत. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या चालीरीती जपत आधुनिकतेसोबत सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करणे, तसेच तरुण पिढीला आपल्या इतिहासाची ओळख करून देणे यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे.

दृष्टीकोन

आमचा दृष्टीकोन म्हणजे एक स्वच्छ, समृद्ध, सुरक्षित आणि स्वयंपूर्ण गाव घडवणे. पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि पर्यावरणपूरक विकासाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावणे हा आमचा मुख्य दृष्टीकोन आहे.

मिशन

नागरिकांच्या सहभागातून पारदर्शक, जबाबदार व कार्यक्षम प्रशासन राबवणे हे आमचे मिशन आहे. गावातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांत सातत्याने सुधारणा करून शासकीय योजना प्रभावीपणे राबवणे, तसेच सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करून देत शाश्वत विकास साधणे हे आमचे प्रमुख मिशन आहे.

ग्रामपंचायत स्थापना

दिनांक :- 1950

लोकसंख्या

2651

पुरुष

1360

स्त्री

1291

कुटुंब संख्या

546

शेतकरी संख्या

759

मतदारांची संख्या

2324

एकूण क्षेत्रफळ

1230.11 हेक्टर

लागवडी योग्य क्षेत्र

938.04हेक्टर

बागायत क्षेत्र

427.59 हेक्टर

स्ट्रीट लाईट पोल

अंगणवाडी

4

जिल्हा परिषद शाळा

3

पोस्ट ऑफिस

1

तलाठी ऑफिस

1

आरोग्य उपकेंद्र

1

नळ कनेक्शन

376

सार्वजनिक विहीर

2

सार्वजनिक बोअर

5

महिला बचत गट

114

प्रधानमंत्री घरकुल लाभार्थी

67

सरकारी योजना

ग्रामपंचायत मलिकपेठ  येथे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून सामान्य नागरिकांपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवण्याचे कार्य सातत्याने केले जाते. शेतकरी, महिला, दिव्यांग, विद्यार्थी, ग्रामीण उद्योजक, बेरोजगार युवक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना उपलब्ध असून त्यांचा अधिकाधिक लाभ ग्रामस्थांना मिळेल हे सुनिश्चित करणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून प्रत्येक कुटुंबाला गृहसुरक्षा मिळावी हा तिचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ, निम्न व मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी किंवा घर दुरुस्तीकरिता आर्थिक अनुदान दिले जाते. स्वच्छ स्वयंपाकघर, स्वतंत्र शौचालय, मजबूत भिंती व छप्पर, तसेच मूलभूत सुविधा असलेले घर उपलब्ध करून देऊन “सर्वांसाठी घर” हे स्वप्न साकार करण्याचे काम सरकार करत आहे. पर्यावरणपूरक बांधकाम तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण साहित्य आणि पारदर्शक लाभ वितरण ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत. या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू कुटुंबांना सुरक्षित, सन्माननीय आणि स्थिर निवासस्थान प्राप्त होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होत आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील बेरोजगारांना किमान १०० दिवसांच्या हमीदार मजुरीचे रोजगार उपलब्ध करून देणारी भारत सरकारची महत्त्वपूर्ण योजना आहे. ग्रामीण विकास, जलसंधारण, वृक्षलागवड, रस्ते बांधकाम, तळी दुरुस्ती, सांडपाणी व्यवस्थापन अशा विविध सार्वजनिक कामांद्वारे स्थानिक पातळीवर रोजगाराची निर्मिती करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे गरजू कुटुंबांचे उत्पन्न वाढून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होते तसेच स्थानिक पायाभूत सुविधा अधिक सक्षम होतात. रोजगाराची पारदर्शक नोंद, मजूरांना थेट खात्यावर वेतन, आणि महिलांना समान रोजगार संधी उपलब्ध करून देणे ही मनरेगाची मोठी वैशिष्ट्ये आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी ही योजना एक प्रभावी आणि टिकावू पाऊल ठरते.

स्वच्छ भारत अभियान ही भारत सरकारची देशभर राबविली जाणारी एक व्यापक स्वच्छता मोहीम आहे. या मोहिमेचा उद्देश ग्रामीण व शहरी भागातील स्वच्छता सुधारणे, उघड्यावर शौचमुक्त वातावरण निर्माण करणे, कचरा व्यवस्थापन मजबूत करणे व नागरिकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती निर्माण करणे हा आहे. ग्रामीण भागात शौचालय बांधकाम, घनकचरा व द्रवकचरा व्यवस्थापन, ग्रामस्वच्छता स्पर्धा, प्लास्टिकमुक्त गावांची निर्मिती यावर विशेष भर दिला जातो. मोहिमेमुळे स्वच्छतेबाबत ग्रामस्थांच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल झाला असून आरोग्यदायी, सुरक्षित व सुंदर गाव निर्माण होण्यास मदत होते. स्वच्छ भारत अभियानामुळे ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळाली आहे आणि प्रत्येक नागरिकाला स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी आहे याची जाणीव करून दिली आहे.

 
 

मिड डे मील (दुपारचे जेवण) योजना ही शालेय विद्यार्थ्यांच्या पोषणाची पातळी सुधारण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने राबविलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकारी व अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ते ८ मधील विद्यार्थ्यांना स्वच्छ, पौष्टिक व उष्मांकयुक्त जेवण मोफत पुरविले जाते. यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढते, ड्रॉपआउट दर कमी होतो आणि मुलांचे सर्वांगीण शारीरिक व बौद्धिक विकासाला मदत होते. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसाठी ही योजना मुलांच्या पोषणाचा महत्त्वाचा आधार ठरते. गुणवत्तापूर्ण अन्न, स्वच्छ स्वयंपाकगृहे आणि पोषणावर आधारित मेन्यूद्वारे मिड डे मील योजना ‘शिक्षण + पोषण’ या दुहेरी उद्दिष्टांची प्रभावी पूर्तता करते.

लाभार्थ्यांचा तपशील

प्रधानमंत्री आवास / घरकूल योजना (सण २०२४-२५)

एकूण पात्र लाभार्थी

55

घरकूल पूर्ण

0

आयुष्यमान भारत कार्ड मलिकपेठ

उद्दिष्ट

0

साध्य

0

दिव्यांग खर्च

१५% मागासवर्गीय कल्याण खर्च

१०% महिला व बालकल्याण खर्च

आमच्या सेवा

ग्रामपंचायत मलिकपेठ गावातील नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी व पारदर्शक, प्रभावी प्रशासन देण्यासाठी कटिबद्ध आहे. आमच्या सेवांमध्ये जन्म-मृत्यू दाखले, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्रासाठी मदत, घरपट्टी व कर वसुली, पाणीपुरवठा व्यवस्थापन, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, ग्रामविकास कामांची अंमलबजावणी, कृषी व पशुपालन विषयक मार्गदर्शन, विविध सरकारी योजनांची माहिती व लाभांची उपलब्धता, तसेच तक्रार निवारण यांचा समावेश आहे.

जन्म प्रमाणपत्र

जन्म नोंदणी आणि प्रमाणपत्र जारी करणे

मृत्यू प्रमाणपत्र

मृत्यू नोंदणी आणि प्रमाणपत्र जारी करणे

घर पत्ता प्रमाणपत्र

राहत्या प्रमाणपत्र आणि घर पत्ता जारी करणे

दारिद्र रेषेखालील दाखला

कुटुंब रेशनकार्ड आणि इतर दस्तऐवज

ग्रामपंचायत येणे बाकी

वेळेवर देयके, सुरळीत सुविधा.

निराधार असल्याचा दाखला

निराधार दाखला लाभांसाठी आवश्यक.

आमचे स्थान

ग्रुप ग्रामपंचायत मलिकपेठ ता. मोहोळ जी . सोलापूर

विविध दाखले मिळविण्यासाठी
ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश- २०१५ नुसार ऑनलाईन पद्धतीने जन्म नोंद/ मृत्यू नोंद/ विवाह नोंदणी दाखला/ दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला/ ग्रामपंचायत येणे बाकी दाखला/ ८ अ उतारा/ निराधार असल्याचा दाखला मागणी करण्यासाठी खालील फॉर्म भरुन पाठवा.